Posts

Showing posts from March, 2025

मळी ते सीमा तपासणी नाका

 रेल्वे प्रवासात, निफाड मार्गाने जातांना एकेकाळी मळीचा वास यायचा. काही वास, काही शहरांसाठी नेहमीच सुवास असतात. कारण त्यामुळे शहराची सुबत्ता राखून असते. मळी म्हणजे गूळ आणि साखर तयार करतांना उत्त्पन्न झालेला असा जड व काळसर पदार्थ, ज्यामध्ये आंबवता येण्याजोगी द्रवरूप साखर असते. निफाड साखर कारखान्याच्या, मळी सारख्याच घट्ट आठवणी तिथल्या प्रत्येकाला आहेत.        कारखाना चालू असतांना तर तिथला अनुभव नाही घेता आला. पण नोकरीच्या प्रशिक्षणानिमित्ताने, त्यातही नाशकात असलेल्या बऱ्यापैकी कारखान्यांमुळे, पुन्हा एकदा मळीकडे वळता आले. आपण गोष्टींकडे किती सहज बघतो. पण मानवाने सगळं काही तयार करतांना त्याचं नियमनही केलं आहे, ह्याची जाणीव मात्र कामाला लागल्यानंतर होते. माझे आता, मळीशी संदर्भात सर्व नियम समजून घेण्याचे दिवस सुरु झाले 😊.      मळी नंतर मद्यार्क (स्पिरिट) निर्मिती. मग स्पिरिटचे नियमही समजून घेणं आलं. स्पिरिट पूर्वी फक्त ऊसाच्या मळीने निर्माण करत. आता मात्र ऊसाच्या अभावापायी इतर धान्यांपासून निर्मित मळीपासून स्पिरिट बनवण्याची परवानगी शासनाने दिली आहे. यात...

सुंदर संध्याकाळ

           शामे हसीन होती है लेकीन यादे दौहराने पर मायुस कर देती है।             दिवस जातोच, मग अस्वस्थ करणारी संध्याकाळ येते..पण ती आल्हाददायक हवा आणि मी उद्या पुन्हा येईन (तो खरंच येतो) म्हणत सोनेरी किनार सोडून जाणारा सूर्य, यांच्या साक्षीने काढलेले फोटो सगळा शीण घालवतात . आफ्टर ऑल, योगेश लिखित, 'आनंद' मधलं, मुकेशच्या आवाजातलं 'कही दूर जब दिन ढल जाये ....' सारखं गाणं आपल्या मनातलं सगळं सार मांडत असतात...

कल्पना ढगांची

    लहानपणी जसं 'दुनिया dairy milk की बन जाये रे' अशी fantasy, जाहिराती मधल्या लहान लेकरांना पाहून तयार व्हायची तसंच ढगांकडे पाहूनही त्यावर जाऊन नाचावं की काय अशी भन्नाट, unique आणि फ्लॉप आयडिया पण डोक्यात यायची.      जसं की, गाडीमध्ये बसल्यावर लांबच्या प्रवासात कधी असं झालंय? मस्त लोळत झोप लागलीये. उठल्यावर खिडकीबाहेर पाहिलं तर ढग खूप सुंदर दिसतायत. अगदी त्यांच्यावरून जाता येईल की काय असे 3D भासताय. ढग कशाचे बनतात हे माहीत नसेपर्यंत त्यांच्यावर मनातल्या मनात नाचून झालेलं असतं पण गोष्टींमागचं विज्ञान कळलं की, भ्रमनिरास होतो. म्हणूनच म्हणतात अज्ञानात सुख असतं. अज्ञानामुळे लहानपणी कल्पनाशक्ती कशी बहर घ्यायची! अगदी, आपण सर्वच टिपत राहतो त्या सुरेख ढगांसारखी! Pictures are from different places and hence captured on very different days.. #sky  #thesedays  #monsoon

"पाणी रे पाणी तेरा रंग.... "

       पाण्यासारखा बॉईलिंग पॉईंट (उष्मांक बिंदू)100°C असावा. उगीच लवकर तापून काही मिळत नाही. "पाणी रे पाणी तेरा रंग केसा.. जिसमे मिलादो, लगे उस जेसा."        किती प्रयत्न करतो आपण माणसं, जिथे जाऊ तसे होण्याचा पण प्रत्येक वेळी आपल्याला जमतंच असं नाही. समजा, जमणार असेल तर आपलंही महत्व पाण्याइतकंच अबाधित राहील. कितीही टिशू पेपर वापरला, तरी पाण्याशिवाय हात साफ झाल्याचं वाटत नाही, कितीही चवदार आणि रंगतदार खाल्लं किंवा पिलं तरी पाण्याची माहित नसलेली चव आणि बेरंगपणात असलेलं समाधान कशातच मिळत नाही.         असं होतं ना? कितीही माणसं असली आजूबाजूला, तरी त्या पाण्यागत नितळ व्यक्तीशी बोलल्याशिवाय आपलंही मन साफ झाल्याचं वाटत नाही. कितीही गप्पा ऐकल्या तरी, त्या एका व्यक्तीच्या बोलण्याशिवाय कानांना समाधानी लाभत नाही.  अशी काही माणसं कधीकधी वेगळ्या IQ ची (बौद्धिक क्षमता) आणि EQ ची (भावनिक क्षमता) असतात तरीही आपल्यासारखी लोकं आजूबाजू नसल्याची खंत फक्त मनाशी ठेऊन जिथे आहेत तसे होण्याचा प्रयत्न करतात.  "गंगा से जब मिले तो बनता गंगा...