Posts

Showing posts from March, 2020

मिनल भावना

काही लोकांना आपण मोजता येईल इतपत भेटलेलो असतो आणि तितकंच बोललेलो असतो. पण या सगळ्यात त्यांच्याशी जे बॉन्ड शेयर करतो , ते खरंच खूप सुंदर असतात. मग अशा वेळी एखाद्या विचित्र कारणासाठी जर त्यांच्या पासून ताटातूट झाली तर चूक कोणाचीही असो पण आपलंच मन स्वतःला अपराधी मानतं. इकडे भावना जड झालेल्या असल्या तरी त्यांच्या कडे काय चालू ए, हे मात्र माहीत नसतं. ते आपलं ऐकायला नसले तरी सांगावेसे वाटते की, "आलेली कठीण वेळ सांभाळायला तू समर्थ आहेस. जी गोष्ट तुला हवी होती पण मिळाली नाही, त्या गोष्टीलाच कदाचित तेवढी योग्यता नसणार. आणि तुझी योग्यता मात्र ह्या सगळ्या गोष्टींच्या खूप पुढे आहे." आपल्या आयुष्यात असे धुमकेतू सारखे येऊन निघून जाणारया लोकांना एकच सांगणे- यशस्वी व्हा, जमल्यास सतत डोळ्यासमोर येणं बंद करा. म्हणजे भावना जड होणं थांबतील. कारण पुन्हा कधी संपर्क होणार असतो आणि कशी ह्या लोकांची खुशाली कळणार असते?

स्वप्नपूर्ती | dream completion .

        आपल्या नकळत आपण खूप phases जगत असतो. त्यातली एक phase म्हणजे मी कधीच लग्न नाही करणार.. मग आपल्या आजूबाजूचे म्हणणार- सगळे असेच बोलतात. ही फेज फार काळ टिकू नये, म्हणून जसं काही एखादी व्यक्ती आयुष्यात येते. जिच्यामुळे आपण हे सर्व विचार सोडून देतो. ती एक अशी व्यक्ती असते, जी आपल्या डोक्यातल्या इतर विचारांसोबतच आपलाही आदर करत असते. ही तिच व्यक्ती असते, जिच्या मुळे आपण कधी न पाहिलेले स्वप्नही पाहायला लागतो. सोबत राहणं ह्या दोन शब्दांखातर अख्खं आयुष्य ह्याच शब्दांना देऊन टाकतो. मग ते लग्न असो की आणखी काही आऊटपुट मात्र फक्त सहवासाचा हवा असतो. आपला सभोवताल आपल्या स्वप्नांना सकारात्मक आसक्ती देऊन जातो. जसं की, इथला सिनेमा, इतरांचे अनुभव ह्या सगळ्यामुळे मनाशी बाधलेली गाठ अधिक घट्ट होते. आणि परिक्षा पास होत नसले तरी हा निकाल माझ्याच बाजूने लागणार असा शेरा मन देऊन टाकतं. स्वप्नांत खूप ताकद असते असं मी वेगळं म्हणायची गरज नाही. कारण ते पूर्ण झालं की, त्याच्या चांगल्या वाईट परिणामांची काळजी उरत नाही. आपलं मन त्या स्वप्नांच्या पूर्ततेतच इतकं विसावलेलं असतं की त्य...

कायदे समजून घेतांना , भाग २.

कायदे समजूनही घेतले पाहिजे आणि आपण कायद्याच्या ज्या राज्यात राहतोय तिथे त्यांच्या मुळे सुरक्षित आहोत ना?? हे देखील माहीत असले पाहिजे. (खालील सहा केसेस चा संदर्भ- झिया मोदी यांच्या टेन जजमेंट्स दॅट चेंज्ड इण्डिया या पुस्तकातून..) 1. 1985 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एक सर्वव्यापी निर्णय दिला. हा निकाल कोर्टाने दिला असला तरी त्याची मुळे भारतीय राजकारणात खोलवर गेली होती. देशातील महिलांच्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षे साठी असलेला कायदा नेहमी प्रमाणे धार्मिक वलय निर्माण करत होता. क्रिमिनल प्रोसीजर कोड (CrPC), 1973 च्या सेक्शन 125 नुसार फारकती घेतलेल्या महिलेस दरमहा ₹500 मिळतील आणि हा नियम न पाळल्यास संबंधित पुरुषास कैद होउ शकते. (हा नियम 2001 मध्ये काढून टाकण्यात आला, परंतू काही राज्यांमध्ये संपूर्ण नियम काढून टाकण्या ऐवजी भरपाईची रक्कम ₹1500 इतकी वाढविण्यात आली. उदा. महाराष्ट्र, त्रिपुरा, पश्चिम बंगाल) आणि CrPC च्या सेक्शन 127 नुसार जर संबंधित स्त्रीला वैयक्तिक कायद्या नुसार भरपाई मिळत असेल तर सेक्शन 125लागू होत नाही. आर्थिक दृष्टया पुरुषांवर अवलंबून असणाऱ्या स्त्रियांची स्थि...

भारतातील काही महत्त्वाचे कायदे समजून घेतांना. भाग १

झिया मोदी, तुमच्या त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ आपल्या संविधानाच्या सरनाम्याचीच आठवण करून देतं.. म्हणजे जसं आपलं संविधान भारतात जगण्याचे कायदे, हक्क्, अधिकार, तत्वं सांगतं; तसंच 'टेन जजमेंट्स दॅट चेंज्ड इंडिया' हे तुमचं पुस्तक उघडल्यावर इथले महत्वाचे कायदे समजून घेऊन ते आता कसे आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलेय हे कळावं हा त्या मुखपृष्ठाचा मुळ उद्देश् आहे का? पण खरचं इंग्रजी मध्ये लिहलं गेलेल्ं हे पुस्तक इथल्या कायदेशीर जगण्याचा ठाव घेतं. ते प्रत्येक सामान्य भाषिक माणसा पर्यन्त पोहोचवण्यासाठी त्या प्रत्येक भाषेचे अनुवादक आहेतच.. परंतु संक्षिप्त रुपात आपल्या माणसांना समजावं यासाठी मी काही टिपणं काढायची ठरविली(अर्थात बरीच वाक्यं मीही इंग्रजीतून मराठीत जशीच्या तशी लिहिली आहेत). मागच्या 50-60 वर्षांच्या इतिहासात घडलेल्या महत्वाच्या घटनांचे निकाल इथल्या सर्वोच्च न्यायालयाने दिले. संपूर्ण देश ज्या व्यवस्थेच्या विश्वासावर जगतो ती म्हणजेच न्याय व्यवस्था! त्यामुळे ह्या व्यवस्थेच् महत्वं नागरिकांसाठी अनन्य साधारण आहे. न्याय व्यवस्थेचा एक चुकीचा निर्णय देशाची दिशा बदलू शकतो.. म्ह...

पर्यावरणाचं नुकसान म्हणजे नक्की काय होतंय?

Image
मानवी मन जितकं संवेदनशील आहे, कधी कधी तितकाच निष्ठूर मानवी स्वभाव भासतो. निसर्ग आपल्या गरजा पूर्ण करू शकतो; पण आपली हाव मात्र पूर्ण होऊ शकत नाही. असं गांधीजींनी विसाव्या शतकात सांगूनही आपण (किमान गांधीजींचे देशवासी) आपली हाव काही कमी करायला तयार नाही. म्हणजे एखाद्या महान व्यक्तिमत्वाला महात्मा, राष्ट्रपिता अशी संबोधनं लावून आपण विषयाला आवर घालत असतो. कारण त्यांचे विचार कृतीत आणणं जड़ जात असतं. कृती अवघड असू शकते पण सगळ्यांनी एकत्र येऊन करायचं ठरलं तर तिला सहजता प्राप्त होते. परंतू, सगळ्यांना एकत्रही यायचं नाहीये आणि ठरवायचं तर मुळीच नाहीये. खरंतर, आपण आपल्या आईसाठी काय करू शकतो? हा प्रश्न एकदा स्वतःला विचारायला हवा. उत्तर होकार्थी येते तर, सगळ्या सजीवांना पोटात घेणाऱ्या धरणीमाई बद्दल आता प्रश्न विचारायची वेळ आली आहे. आणि उत्तरांवर अंमलबजावणी करण्याची चालू क्षणा खेरीज दुसरी योग्य वेळ असूच शकत नाही. कारण पर्यावरणाचा ऱ्हास मानवाने केला आहे मग उपाययोजना देखील मानवानेच करायला हव्या. पर्यावरणातील एक एक घटकाचे ऋण आपण जाणतो. वातावरणातील हवा, शिलावरणातील दगड, जलावरणातील पाणी आणि ह्या सगळ्यांन...

जात | caste

प्रिय शेक्सपिअर, नावात काय असतं? असं तू विचारायला नको होतं, कारण नावात जात असते. *आजपर्यन्त जातीबद्दल मनात कोणतीच भावना न ठेवता जगत आलेली व्यक्ती किंवा तशी भावना ठेवण्याची गरजही वाटली नसेल अशी व्यक्ती जेव्हा मलाही माझ्या जोड़ीदाराच्या जातीचं व्हायचयं असं म्हणत असेल तर ही समस्त आधूनिक समाजाची हार आहे. समस्या आणि प्रश्नांचं चीड़ आणणार जाळ टाकून त्यात आपल्या सर्वानांच अस्मिता म्हणून किंवा इच्छा नसतांना सतत त्यात अङ्कवून 'जात' ह्या बाबीने शिकार बनवलयं.. मग हे समीकरण नक्की बनलं कसं? आणि असं उकल नसलेलं समीकरण बनवून व्यवस्थेने मिळवलं तरी काय? साधारण 17 व्या शतकात पोर्तुगीजांनी युरोप मध्ये 'वारसा वर्ग स्थिती' (hierarchical class condition) या संज्ञेसाठी 'casta' हा शब्द वापरला होता. नंतर इंग्रजी शब्द- 'caste' हा लॅटिन मधील castus आणि मूळ शब्द 'carere' या वरुन अवतरला. caste हा शब्द जरी 17 व्या शतकात आला असला तरी ही व्यवस्था काही आपल्याला नवीन नाही. इ. स पूर्व 1000 साली ऋग्वेदा मध्ये चार वर्णांचा उल्लेख आढळतो. तेव्हा वर्णव्यवस्थाच जातीव्यवस्था होती असे म्हण...

बबन

      हीरो जेव्हा महागड़या बाइक्स, कार्स घेऊन पडदयावर येतो तेव्हा आपली करमणूक होत असते पण त्या ऐवजी दुधाची can भरून त्याने जर M 80 गाड़ी स्टार्ट केली आणि attitude दिला तर ते सरळ हृदयाला भिडलेलं असतं. कारण असं नैसर्गिक दाखवलेल्या गोष्टींचा वास्तवाशी जवळचा संबंध असतो. हीरोने आपल्या स्वप्नातल्या राणीबद्दल फिल्मी भाषेत बोललेलं प्रेक्षक नेहमी पाहतात पण 'कुठं तर्फडली होती कायनू' असं त्याच्या तोंडून ऐकणं म्हणजे अत्युच्च गुदगुदल्या होत्या.. सामान्यतः हीरोचा बाप एकतर कॉमेडी, एकतर गंभीर, किंवा एखाद्या ठरलेल्या साच्यातला असतो पण इथे आख्ख्या सिनेमाचा भाव एकटा बापच घेऊन जातो आणि आपण दिग्दर्शका सोबत उत्कृष्ट नट देखील असल्याची जाणीव करून देतो. शब्द, डायलॉग, गाणी काय सांगतील अशा पद्धतीने नुसत्या अश्रु मधून भावना व्यक्त करायची किमया बबन च्या आईने करून दाखवलीये.. सामाजिक सिनेमा करताना वाद उद्भवतो कारण त्यात जात, धर्म इ.चा कुठेतरी परामर्श झालेला असतो पण इथे स्वतः च्या स्वप्नांसाठी लढणाऱ्या युवकाची कहानी मांडली असल्यामुळे आता कोणाशी वाद घालावा हा प्रश्न समाजात दुही निर्माण करणाऱ्यांना पडू शकत...