स्वातंत्र्यानंतरचा भारत भाग चार
Image source मागच्या ब्लॉग मध्ये निवडणुकांविषयी समजून घेतल्यानंतर आता आपण वळत आहोत, भारतातील राजकीय पक्षांकडे.. काँग्रेस पक्षाला सर्वमान्य मानले गेले असेल तरी , अन्य काही पक्ष उभारी घेऊ लागले होते. नेहरू सरकारच्या अंतर्गत उद्योगमंत्री ( संदर्भ ) असलेले श्यामा प्रसाद मुखर्जी ऑक्टोबर 1951 मध्ये भारतीय जन संघ बनवण्यासाठी काँग्रेस मधून बाहेर पडले. जे बी कृपलानी यांनी किसान मझदूर संघाची स्थापना केली. राम मनोहर लोहिया आणि जय प्रकाश नारायण यांनी समाजवादी पक्ष बनविण्यावर भर दिला. भीमराव आंबेडकरांनी सुद्धा Schedule Caste फेडरेशनला नव्या जोमाने पुढे आणले व नंतर रिपब्लिक पार्टी असे या पक्षाचे नाव केले. तत्कालीन एकत्रित Communist ( साम्यवादी) पक्षाने तेलंगणा मध्ये शस्त्रास्त्रे त्यागून वरील पक्षांप्रमाणेच निवडणूक लढली. अशा पद्धतीने पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ५३ राजकीय पक्षांनी सहभाग घेतला. निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार, १४ राष्ट्रीय पक्ष होते. १८७४ उमेदवारांपैकी ५३३ अपक्ष होते. जाणून घेऊ, राष्ट्रीय पक्षांची नावे - १. अखिल भारत...