पश्चिमेकडचा राष्ट्रवाद (भाग २)
मानवाचा इतिहास आजवर आलेल्या अडचणींना सामोरे जात घडत असतो.या अडचणी पृथ्वीवरच्या भिन्न ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात येत असतात आणि त्यांना कोण कशा पद्धतीने सामोरं जातंय यावरून तिथल्या माणसांचं वेगळेपण दिसत असतं. भारताच्या डोक्यावरील ताज ढगांसारखा बदलत राहिला. कधी हवाहवासा तर क़धी विजेसारखा काळोखी.. आता फक्त पायदळ, हत्ती, उंट, राजेशाही, घुमट इ राहिले नाही. आता पाश्चिमात्य देशाचे अंग ह्या मातीत उतरू लागले आहेत. पूर्वीचे मुघल, पठाण इ. त्यांच्या वंशांवरून आणि धर्मावरून ओळखले जात होते पण आता हे देशांचे आक्रमण आहे. शिवाय अजून आपला स्वतःचा देश ही संकल्पना आपल्याकडे नसतांना आपल्याला पाश्चिमात्य देशांसोबत संघर्ष करावा लागतोय. तर मग देश काय आहे? लोकांचे राजकीय आणि आर्थिक संघ जे यांत्रिक हेतूने एकत्र येतात. समाज हा मानवाची सामाजिक प्रतिमा आहे. तो, माणसांचं नैसर्गिक नातं दर्शवतो, ज्यामुळे माणूस जगण्याचे तत्व एकमेकांना मदत करत प्रस्थापित करत असतो. त्याची राजकीय बाजू काही खास कारणानेच दिसून येते. जेव्हा राजकीय आणि वाणिज्य संस्था , म्हणजे खरं तर एक देश, तोलमोल राखण्याऐवजी...