Posts

Showing posts from August, 2019

मैत्री

"मैत्रीशिवाय आयुष्य म्हणजे आकाशा शिवायची पृथ्वी!" .. असं लिहून प्रवीण दवणेंनी किती कमी शब्दांत मैत्री ची योग्य व्याख्या मांडली आहे..  Sharing  of a pencil, is the best medium to start a sweet relationship अशा आशयाचं कुठेतरी वाचायला मिळालं होतं, यात तथ्य किती आहे माहित नाही पण माझ्या मैत्रीच्या प्रवासाची सुरुवात एका पेन्सिल पासूनच झाली होती. आणि त्यामुळे माझ्या आयुष्यात 'जागृती' आली होती.  ज्या  वयात घरातली माणसं सोडून इतर नाती समजत नसतात, त्या अजाण वयात अचानकच गट्टी होते आणि मैत्री काय असते हे कळत नसतानांही ती अनुभवायला मिळते. मैत्री फक्त दोन जीवांमधलं नातं म्हणून उरत नाही तर ती एक भावना म्हणून जगली जाते.. खरंतर अशा मैत्रीला,  जिच्या बद्दल कोणाच्याच मनात दुमत नसणार, तिला असं शब्दांत कैद करून उतरवणं म्हणजे एक बंधनच आहे. तरी देखील आजवर जगलेल्या आणि अशाच निर्मळ मैत्रीच्या आशेत जगण्याची इच्छा बाळगून असणाऱ्या आपल्या सर्वांसाठी लिहीलेला हा मैत्री प्रपंच... प्रत्येक दिन दिमाखात साजरी करण्याची मनुष्याची प्रथा आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांचा आवडता दिन कसा मागे राहील?...

'नव्या युगातील कवी'

मूळच्या हिंदी कवितेचा मराठी अनुवाद केलाय. 'नव्या युगातील कवी' नव्या युगातील कवीने माचिस ची काडी जाळली आणि जोर जोराने ओरडायला सुरुवात केली- 'मशाल मशाल'. पण बघितलं तर, त्या कवीच्या हातात एक विझलेली छोटीशी आगकाड़ी आहे. धुराची एक छोटीशी, खुपच छोटी रेष त्या आगकाडी वर बाष्पासारखी दिसतेय. असं मानलं गेलं की, कवी कुठून तरी मशाल पेटवून येत आहे. पण कुठे? असं कधीतरी विचारलच जाईल, हे तर कवी नीट जाणतच असणार- पण सध्या, त्याला इतकं काम करून थकल्या मुळे थोडा आराम करू देऊ.. नंतर कवींचा 'मशाल मशाल' असा ओरडण्याचा आवाज काळाच्या पाठीवर नोंदला गेला.. त्या वेळी जेव्हा केव्हा कवींकड़े पाहिलं गेलं तेव्हा त्यांच्या हातात विझलेली आगकाडी आणि त्यातून निघणारा धूर दिसला.. मानलं की, खुप सारी मशालं जळलीये.. ईथे.. तिथे.. पण कुठे? हे सांगणं जरा कठीण होतं.. पण कवींवर संशय घेणेही कठीण होतं.. आणि ह्या कृत्याला घोर अनैतिक असेही म्हटले जायचे.. पण कवी ने म्हटलयं तर मानलं गेलं की, मशाल तर जळलीच असणार., त्या मशालीच्या तेजाचा फायदा कोणी ना कोणी घेतलाच असणार.. आता हळू हळू विझणाऱ्या आगका...

नाशिक

Image

ठेच

ठेच -तशी असते तात्पुरती पण जो क्षणिक त्रास देऊन जाते त्यामुळे पुन्हा कधी लागायलाच नको असं वाटतं. दुःख किंवा अडचणी सुद्धा अशाच असतात काही काळा पुरत्याच् येतात पण मन पुन्हा त्यांना सामोरं जायला नको म्हणतं.. ठेच.. फक्त पायालाच लागते असं नाही तर ती कधी कधी मानसिक किंवा बौद्धिकही असते.      लहान पणा पासून बघत असलेलं स्वप्न स्पर्धेच्या बाजारात विकलं जात आहे हे कळलं तरी ठेच लागल्यागत होतं.. ज्या समाजात राहतो त्या समाजाची दांभिकता कळायला लागल्यावर ठेच पोहोचते.. आपलं मन कितीही साफ असलं तरी समोरची मनं विष ओकत राहिली तर ठेच लागते.. हल्ली पाय अडकून लागल्यावरच ठेच पोहोचते असं नाही तर साधा तोल गेला तरी रक्तबंबांळ झाल्यागत होतं.. लांब पल्ल्याच्या शर्यतीत सोडलेल्या घोड्यांसारखे धावतांना आपण पहिल्या क्रमांका पासून दुरावतोय हे कळलं तरी ठेच लागून पडलोय असा भास आत्ताच्या पिढीला होतो.. ही ठेच म्हणजे जखम असते; मृत्यु नव्हे इतकं साधही न कळणारयांच मन ती विषण्ण करते. इतरांचा हेवा करता करता स्वतःच्या वाटेत लक्ष नाही दिलं तरी ठेच लागते.. आणि मग जीवाने आई गंss अशी आरोळी दिल्यावर हे वागणं...

म माणूसकीचा

Image
घरी renovation च काम चालू होतं, आई कारागीरांना दिलेलं पाणी संपलय का? ते जेवत असतील तर त्यांना भाजी, लोंच नेउन देणं असं रोज करायची. ही जरी साधारण गोष्ट असली तरी आजूबाजू घडणाऱ्या ह्या गोष्टी माणसाला नेहमीच माणूस म्हणून जगवण्याची प्रेरणा देतात. आणि मनुष्य प्राणी असा आहे की स्वतःच एक व्यवस्था बनवून स्वतःच त्यात फाटे तयार करत असतो. म्हणजे ह्या बोलण्यातून बरीच नकारात्मकता डोकावू शकते पण काहींची माणुसकी स्वतःच्या कोशापूरती मर्यादित असते. अर्थात हा जरी वैयक्तिक प्रश्न असला तरी त्यातला बड़ेजाव मात्र कमी व्हायला पाहिजे. काय बरं व्याख्या होईल माणुसकीची? पाहायला गेलं तर विशिष्ट अशी काहीच नाही.. कधी कधी सतत नजरानजर होऊन खुप ओळख असल्यागत चेहरयावर smile येते. हेच असतं ना माणूसपण? नुसतं रोज एकाच बस किंवा रेल्वेने प्रवास करतांना दिसतोय म्हणून बोलायला सुरुवात होते आणि बस/रेल्वेचा प्रवास मैत्री कड़े पण चालू होतो. हीच असते ना माणसाच्या आतली भावना? समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू पाहून आपल्यालाही भावनाविवश व्हायला होतं.. ही असते ना माणसाची संवेदनशीलता? रस्त्याने एखादी हतबल व्यक्ती किंवा कधी कधी प्रा...

प्रश्न

Image
ते कुठेही छळतात.. घरात, बाहेर.. एखाद्या पोकळीतही उद्भवतील का? गर्दीत आणि एकटेपणातही धुमाकूळ घालतात.. त्यांची निर्मिती कशी झाली? पुन्हा प्रश्न.. तुम्ही आणि आम्हीच केलीये ना; जावं का मग हे सगळं सोडून? पुन्हा प्रश्न.. पण कुठे? जिथे गर्दी नसेन? म्हणजे कुठे? वाळवंटी की ध्रुवावर? तिथेही येईल का गर्दी? उत्तरं शोधत येईलच म्हणा.. मग परत तिथूनही सुटका व्हावी असंच वाटेल ना.. अरे...!! प्रश्न सुटणार नाहीच.. तो विस्तारत राहील.. अखेर पर्यन्त.. मला पण जीव जाई पर्यन्त करायचाय विचार.. प्रश्नाचा?- नाही त्याला सोडवण्यासाठी सज्ज होण्याचा.. -तेजल एस. डी. (Image courtesy- stock.com)

पत्र 2

Image
माझ्या प्रिय बाळास,        खरंतर, हे पत्र तुला वाचायला मिळेल तेव्हा तू बाळ नसणार आहेस.. पण आई साठी नेहमी बाळ असणाऱ्या तुला चार गोष्टी महत्वाच्या सांगणं माझं काम आहे.. तुझं अस्तित्व ह्या जगात येण्यापूर्वीच मी हे पत्र लिहायला घेतलंय.. मला मान्य आहे की, घरातलं सगळ्यांचं वागणं आणि तुझी शाळा यामुळे काही नैसर्गिक गोष्टींंचं महत्व तुला कळणारच आहे. पण सगळं समजल्यावरही कधी कधी विरोधात वागलं जातं आणि त्या अपराधी भावनेतूनच मी आज हे पत्र लिहतेय असं समज. तुझं वाचन आणि तुझ्यातील समज यांचा परिपाक होत असतांंनाच हे पत्र तुझ्या पर्यंत पोहोचेल याची मी खबरदारी घेईल.      बाळा, आई आणि पप्पा यापेक्षाही तू जास्त वेळा उच्चारलेला शब्द 'मम्मम' असेल. म्हणजे अगदी लहानपणापासूनच पाणी एखाद्या भावनेसारखं तुझ्या सोबत आणि प्रत्येकच जीवासोबत जडलंय. पाण्याशिवाय जीवनच व्यर्थ आहे ते उगीच नाही म्हणत ना! आपलं हे मुख्य पेय आहे यासोबतच तुला जलचक्रही शिकवलं असेल.. त्यामुळे त्याबद्दल आज मी इथे काही लिहीणार नाही पण ते जलचक्र सुरळीत चालावं यासाठी काही गोष्टी तुला माहीत असणं महत्वाचं वाटतं. ...

पत्र १

Image
माझ्या प्रिय भारतदेशा,         तुझ्यावर करत असलेल्या प्रेमाला ही पत्र रूपी जोड़ देण्याचा आज मी प्रयत्न करतेय. नुक़तंच रविंद्रनाथ टागोरांंनी बंगाली मध्ये लिहिलेले 'आमार देशार माती' वाचलं. अर्थात त्याचा हिंदी आणि इंग्रजी अनुवाद वाचतांंना तू जतन केलेल्या समृद्ध भाषांंचा अभिमान वाटला. फक्त भाषाच नाही, इथल्या अनेक जाती, धर्म, परंपरा, पंथ असं सारं एकत्र बांधून तू ह्या जगात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. तुझी भौगोलिक स्थितीही आपल्या वेशभूषा, अर्थशास्त्र ह्या सर्वांनांंच विविधता अंगी बाणायला लावणारी... त्यामुळे उभ्या विश्वात स्वतःची 'भारतीय' अशी ओळख सांगताना  तुझ्यासमोर आपसूकच माथा झुकेल.. आणि तेव्हा भारतीय ह्या अस्तित्वापुढे इतर सर्व जाणिवा नगण्य वाटू लागतील..        तुझ्या वैभवशाली इतिहासाला ह्या हृदयात एक खास जागा आहे. कधी कधी भिती वाटते हृदयाच्या ह्या खास जागेचं डोक्यातील गर्वाकडे मार्गक्रमण झालं तर? तर, ती अंधःकार घेऊन येणाऱ्या भविष्याची नांदी राहील. कारण अशा उत्तेजित करणाऱ्या गोष्टी सुरुवातीला अस्वस्थ करतात, नंतर गोंधळ माजवतात आणि शेवटी ...