Posts

Showing posts from May, 2025

स्वातंत्र्यानंतरचा भारत भाग सात

Image
      वैज्ञानिक प्रगती  तत्कालीन भारताचे पंतप्रधान भारताच्या अनेक समस्यांचे उत्तर विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे, असं मानत. मार्च 1958 साली वैज्ञानिक धोरण ठराव संमत झाला. ज्यामुळे देशाची आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती यातही विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वाटा असणार होता. यापूर्वीही अनेक वैज्ञानिक संस्था उदयाला येत होत्या. हे मूल्य देशात रुजवण्यासाठी CSIR चे अध्यक्षपद नेहरूंनी स्वतःकडे घेतले.  या धोरणापूर्वी जानेवारी 1947 मध्ये राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा NPL ही भारताची पहिली प्रयोगशाळा स्थापिली गेली. यासोबतच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या 17 प्रयोगशाळा उभ्या राहिल्या.  MIT च्या धर्तीवर खरगपूर मध्ये, पहिली IIT 1952 मध्ये सुरु झाली.  ऑगस्ट 1948 मध्ये होमी जहांगीर भाभा यांच्या अध्यक्षतेखाली अणू ऊर्जा आयोग उभारला गेला. नेहरू वैयक्तिकरित्या डॉ भाभा यांना सर्वोकृष्ट काम करण्यास चेतावणी देत. 1954 ला सरकारने अणू ऊर्जेसाठी स्वतंत्र खाते सुरु केले. ज्याचे सचिव स्वतः भाभाच होते. ऑगस्ट 56 मध्ये भारताचा पहिला आण्विक ऊर्जाभट्टी प्रकल्प ट्रॉम्बे येथे स्थापन करण्यात आला. हा खर...

पायवाट

Image
  आपण एका खेडीप्रधान देशात राहत असल्याने, लांबच्या प्रवासात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातांना अनेक गाव- खेडी, त्यातली शेती, असं बरंच काही (थोडक्यात शहरापासून लांब असलेलं) लागतं. त्यात छोटे छोटे रस्ते दिसतात. खरं, रस्ते नाहीत, पायावटाच त्या. नुसतंच मोबाईल फोन मध्ये फोटो काढण्यात धन्यता मिळणार नाही असे. असं वाटतं गाडीतून उतरून ही वाट आत्ता चालायला घ्यावी का? पण नाही ना चालता येत. ना ते गाव माहित असतं, ना तो रस्ता, ना त्याचं शेवटचं टोक. ह्या आवडणाऱ्या गोष्टी आपल्याला कुठे नेणार असतात कधी कळतच नाही. आवड मात्र प्रत्येक प्रवासात तशीच आणि तितकीच राहते.           हे रस्ते किंवा पायवाटा जगायची वेळ येते, तोपर्यंत जबाबदाऱ्या वाढून, आयुष्यात मिळणारा वेळ कमी होऊन, आपण धरलेली एकच वाट जगण्यात, धन्यता मानू लागतो. म्हणजे पूर्वी वाटतं की जगण्यात थोडा समतोल साधता आला की, या छोट्या छोट्या सुखाच्या गोष्टी पाहिजे तेव्हा करत जाऊ. आणि समतोल साधला जातोय असं वाटू लागलं की, वेळ पुरत नाही.       या पायावाटा पण दुसरं तिसरं काही नसणार. त्या वेळेचा हिशोब मांडत...

डिअर जिंदगी

         "अब जैसे हू, पेहले नहीं थी में ऐसी|" Maturity and motherhood made me physically available somewhere else and mentally at home.  सततचे विनोद, नोकरीला लागल्यापासून कमी झालेय असं वाटतंय. की जोडीला कोणी नसतं म्हणून असं होतं काय माहित? Whatever... this election duty has made me to think twice about myself.         आणि त्यानंतर ड्युटी करतांना आलेले अनुभव असे की, एके काळी 'डिअर जिंदगी' हा सिनेमा मला मोठ्या लोकांच्या अडचणी सांगणारा वाटला होता. त्या मोठ्या लोकांच्या यादीत मी कधी जाईल असं मात्र वाटलं नव्हतं. आपले सामान्यांचे प्रश्न, अडचणी आणि उपाय सर्व काही मूलभूत गोष्टींजवळ आडतात असं वाटायचं मला. मग जेव्हा या मूलभूत मधलीच एक नोकरी लागते तेव्हा नैराश्येची व्याख्याच बदलते. तिथल्या वातावरणाने, कुणाच्या तरी असण्याने, कुणाच्या तरी नसण्याने पण खूप काही घडतं. Mid age crisis की काय हेच असावेत का?        आयुष्याची ऐकतीशी एकीकडे ओलांडताना दुसरीकडे हार्मोनल बदलही होत असेल का? म्हणजे आपण काय feel करतोय हे ह्या बियॉलॉजिकल घटक...