भारतातील राष्ट्रवाद
रवींद्र नाथ टागोर यांच्या मते, भारताची खरी अडचण राजकीय नसून सामाजिक आहे. खरंतर, ही समस्या सर्व राष्ट्रांची आहे. पश्चिमेकडील राजकारणाने तेथील मूल्यांवर वर्चस्व गाजवले आहे आणि भारतही त्याचे अनुकरण करत आहे. टागोर सांगतात, भारताने खूप संकटातून काहीतरी करायचा प्रयत्न केला आहे. आपला देश विभिन्न वंशांसोबत एकता शोधत असतो. इथले संत, जसं की नानक, कबीर आणि चैतन्य इ. एकाधिश्र्वराची शिकवण देतात. ते पुढे म्हणतात," संपूर्ण जग विज्ञानाच्या साहाय्याने एक बनत आहे. आणि असा क्षण येतो जेव्हा आपण समजतो की, एकतेचे मूळ हे अराजकीय आहे." मानवाचा इतिहास हा एकच इतिहास आहे. सर्व राष्ट्रीय इतिहास हे फक्त त्यातील धडे आहेत. आणि भारतीय ह्या महान गोष्टीचा एक भाग आहेत . केवळ तीच लोकं टिकतात जी सहकार्यात पुढे असतात. सुरुवाती पासूनच इतिहासात जेव्हा प्रत्येक देशाच्या भौगोलिक मर्यादा होत्या आणि संवादाच्या सुविधा कमी होत्या ,तेव्हा संघर्ष आणि जुळवून घेणे ह्या गोष्टीह...